शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

फलज्योतिषातील प्रचलित पृथ्वीकेंद्रित पद्धती प्रमाणे किती पत्रिका संभवतात ?

 #फलज्योतिष_गुंतागुंत


=====================================================

फलज्योतिषातील प्रचलित पृथ्वीकेंद्रित पद्धती प्रमाणे किती पत्रिका संभवतात ? 

=====================================================


:-)  **  वैधानिक सूचना : ज्यांना आकड्यांचा कंटाळा आहे त्यांनी ही पोस्ट टाळावी  **  :-) 


====


आठवलेले सर्व संभाव्य घटक विचारात घेत मी एक प्रयत्न केला आहे. 


**  ह्या प्रयत्नात, गणितात काही त्रुटी, चूक आढळल्यास अथवा मी वापरलेल्या तर्कामध्ये वा पद्धतीमध्ये काही चूक आढळल्यास अवश्य निदर्शनास आणावी.   **


(इथे  एकम, दशम, शत, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, मध्य, अंत्य, जलधि, परार्ध  ही अंकगणना विचारात घेतली आहे.)

(योग्य अंकगणना कोणती ह्याबद्दल मतमतांतरे आहेत ह्याची कल्पना आहे.) 


फलज्योतिषातील प्रचलित पृथ्वीकेंद्रित पद्धती प्रमाणे किती पत्रिका संभवतात ? 


ह्याचे अचूक उत्तर अनंत असे नाही, मात्र ते अगणित असेच आहे. 

आणि ते उत्तर अगणित का आहे ह्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे काळाच्या कोणत्या एककामुळे पत्रिकेत फलितदृष्ट्या सूक्ष्म का होईना फरक पडतो हे आज आपल्याला ज्ञात नाही (खरंतर ठामपणे ज्ञात नाही).


त्यामुळे गणितदृष्ट्या किती विभिन्न पत्रिका संभवतात आणि फलितदृष्ट्या किती विभिन्न पत्रिका संभवतात ह्याचे आकडे वेगवेगळे असतील आणि येतील असे माझे अनुमान आहे. 

कसे ते पुढील लेखात स्पष्ट होईल. 


--


टप्प्याटप्प्याने अंदाज बांधत गेल्यास आपल्याला काही आडाखे बांधून, त्या 'अनंताच्या' बर्‍याच अलीकडची काही एक कल्पना येऊ शकते. 


--


अत्यंत ढोबळ मानाने आरंभ केल्यास : 


A)


१२ ग्रह आणि १२ राशी असा विचार केला तर गणित फार सोपे दिसते.

पण प्रत्यक्षात असे नाही. 


राहू आणि केतू कायमच १८०॰ दूर असतात त्यामुळे ह्यापैकी एक वगळता येईल. 

त्यामुळे आता ११ ग्रह आणि १२ राशी असा विचार होतो. 

त्या व्यतिरिक्त कुंडलीसाठी 'लग्न' महत्त्वाचे असल्यामुळे पुन्हा १२ चलबिंदू (केतू व्यतिरिक्त ग्रह + लग्न) आणि १२ राशी असा विचार करायला हवा. 


पण बुध हा सूर्यापासून अधिकतम २८॰ दूर जाऊ शकतो. त्यामुळे सूर्याची रास नक्की झाल्यावर बुधाच्या संभाव्य राशी केवळ तीनच होऊ शकतात. 

तसेच शुक्र सूर्यापासून अधिकतम ४८॰ दूर जाऊ शकतो. त्यामुळे सूर्याची रास नक्की झाल्यावर शुक्राच्या संभाव्य राशी केवळ पाचच होऊ शकतात. 


तूर्तास बुध व शुक्र ह्यांना बाजूला ठेवून गणित करायचे झाल्यास : 

१२ राशी आणि १० चलबिंदू (बुध, शुक्र, केतू व्यतिरिक्त सर्व ग्रह + लग्न) असा विचार करून प्रथम गणित करायला हवे. 


१० चलबिंदू १२ राशींमध्ये किती प्रकारे ठेवले जाऊ शकतात ? 

ह्याचे उत्तर अर्थातच  १२^१०  (अर्थात १२ चा दहावा घात)  =  ६१,९१,७३,६४,२२४   अर्थात एकसष्ट अब्ज, एक्क्याण्णव कोटी, त्र्याहत्तर लक्ष, चौसष्ट सहस्र, दोनशे चौवीस. 


सूर्यसापेक्ष  बुधाच्या संभाव्य राशी अधिकतम तीनच असल्यामुळे, आता ह्यात बुधाचा समावेश केल्यास,  वरील संख्येला तीनने गुणायला हवे. 

६१,९१,७३,६४,२२४ x ३  

=  १,८,५,७५,२०,९२,६७२   

अर्थात एक निखर्व, आठ खर्व, पाच अब्ज, पंचाहत्तर कोटी, वीस लक्ष, ब्याण्णव सहस्र, सहाशे बहात्तर. 


आता ह्यात शुक्राचा समावेश केल्यास, सूर्यसापेक्ष  शुक्राच्या संभाव्य राशी अधिकतम पाच असल्यामुळे वरील संख्येला पाचने गुणायला हवे. 

१,८,५,७५,२०,९२,६७२ x ५ 

= ९,२,८,७६,०४,६३,३६० 

अर्थात नऊ निखर्व, दोन खर्व, आठ अब्ज, शहात्तर कोटी, चार लक्ष, त्रेसष्ट सहस्र, तीनशे साठ. 



हा आकडा नि:संशय प्रचंड मोठा आहे, पण प्रत्यक्षात शक्य असणार्‍या सर्व पत्रिकांच्या तुलनेत तो काहीच नाही. 

कारण इथे आपण केवळ राशीस्थिती विचारात घेतली आहे अंशात्मक स्थिती नाही. 


====


B)


राशीचक्राचे एकूण अंश ३६०. तर्कदृष्ट्या विचार केल्यास सूक्ष्मस्तरावर जाण्याचा पण तर्कदुष्ट न होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे विकला स्तरावर विचार करणे.  

विकला स्तरावर विचार करायचा झाल्यास ३६० x ६० x ६० = १२,९६,००० असे बिंदू होतात, जिथे लग्न आणि ग्रह असू शकतात. 

म्हणजेच मघाशी आपण ह्या १२ राशी घेतल्या त्या ऐवजी खरंतर राशीचक्रातील विकलास्तरावरची १२,९६,००० स्थाने (बिंदू) घेतली पाहिजेत. 

तत्वत: एकाच बिंदूवर आपण विचार केलेले सर्व चलबिंदू (केतूव्यतिरिक्त सर्व ग्रह व लग्न) असू शकतात. 


१० चलबिंदू (केतू, बुध, शुक्र वगळून आणि लग्नाचा समावेश करून)  १२ राशींमध्ये किती प्रकारे ठेवले जाऊ शकतात असा विचार करण्याऐवजी 

१० चलबिंदू (केतू, बुध, शुक्र वगळून आणि लग्नाचा समावेश करून)  १२,९६,००० स्थानी किती प्रकारे ठेवले जाऊ शकतात असा विचार केला पाहिजे. 


म्हणजेच मघाशी जो १२ चा दहावा घात घेतला त्याऐवजी १२,९६,००० चा दहावा घात घेतला पाहिजे. 

१२,९६,००० ^ १०  

= १,३,३,६,७,४,९४,५३,८८,४३७,३,४,०,६,७,८,३,८,८४,५९,७६,५७६ x (१०^३०)  


अर्थात १,३,३,६,७,४,९४,५३,८८,४३७ परार्ध, ३ जलधि, ४ अंत्य, ० मध्य, ६ शंकू, ७ महापद्म, ८ निखर्व, ३ खर्व, ८ अब्ज, ८४ कोटी, ५९ लक्ष, ७६ सहस्र, पाचशे शहात्तर  x १० तीसावा घात. 


---- 


बुध हा सूर्याच्या कोणत्याही बाजूस अधिकतम २८॰ (इथे अचूकपणे कला, विकला स्तरावर न जाता, २८॰ असे approximation घेतले आहे) दूर जात असल्यामुळे, आता ह्यात बुधाचा समावेश केल्यास, दोन्ही बाजू लक्षात घेता  २८ x २ x ६० x ६० = २,०१,६०० इतकी विकलास्तरावरची बुधाची संभाव्य स्थाने होतात. 

म्हणजेच वरील संख्येला २,०१,६०० ने गुणायला हवे. 

१,३,३,६,७,४,९४,५३,८८,४३७,३,४,०,६,७,८,३,८,८४,५९,७६,५७६ x (१०^३०)   x  २,०१,६००


हा गुणाकार पुढीलप्रमाणे येतो

२,६,९,४,८,८,६,८,९,९०,३०,८९,६७८,८,०,७,६,३,१,१,३,४८,८७,७७,२१६ x (१०^३२)    


अर्थात २,६,९,४,८,८,६,८,९,९०,३०,८९,६७८ परार्ध, ८ जलधि, ० अंत्य, ७ मध्य, ६ शंकू, ३ महापद्म, १ निखर्व, १ खर्व, ३ अब्ज, ४८ कोटी, ८७ लक्ष, ७७ सहस्र, दोनशे सोळा  x १० बत्तीसावा घात. 


----


शुक्र सूर्याच्या कोणत्याही बाजूस अधिकतम ४८॰ (इथे अचूकपणे कला, विकला स्तरावर न जाता ४८॰ असे approximation घेतले आहे) दूर जात असल्यामुळे, आता ह्यात शुक्राचा समावेश केल्यास, दोन्ही बाजू लक्षात घेता  ४८ x २ x ६० x ६० = ३,४५,६०० इतकी विकलास्तरावरची शुक्राची संभाव्य स्थाने होतात. 

म्हणजेच वरील संख्येला ३,४५,६०० ने गुणायला हवे. 

२,६,९,४,८,८,६,८,९,९०,३०,८९,६७८,८,०,७,६,३,१,१,३,४८,८७,७७,२१६ x (१०^३२)   x  ३,४५,६००


हा गुणाकार पुढीलप्रमाणे येतो

९,३१३,५,२,९,१,२,३,०,५,०७,७९,२९,९५९,१,७,३,२,०,२,१,७,२१,४०,५८,४९६ x (१०^३४)


अर्थात ९,३१३,५,२,९,१,२,३,०,५,०७,७९,२९,९५९ परार्ध, १ जलधि, ७ अंत्य, ३ मध्य, २ शंकू, ० महापद्म, २ निखर्व, १ खर्व, ७ अब्ज, २१ कोटी, ४० लक्ष, ५८ सहस्र, चारशे शहाण्णव  x १० चौतीसावा घात. 


थोडक्यात विकलास्तरावर गेल्यास गणितदृष्ट्या संभावणार्‍या पत्रिकांची संख्या अतिप्रचंड अशी ७२ आकडी आहे !!!

--


=========


वरील उदाहरणात आणखी काही घटक विचारात घेणे आवश्यक आहे. 


(C)


(१) वक्री वा स्तंभी ग्रह


ह्याचे गणित होऊ शकते. 


बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्या ग्रहांचे वक्री व स्तंभी होणे लक्षात घेतल्यास  

(स्पष्ट राहू नुसार राहू मार्गी / स्तंभी होतो ते इथे विचारात घेतलेले नाही) 


एकंदर आठ ग्रह वक्री असण्याची शक्यता विचारात घ्यायला हवी. कारण फलितदृष्ट्या त्या वेगळ्या पत्रिका होतात. 

तसेच वरील आठ ग्रह पूर्णपणे स्तंभी असण्याची शक्यता विचारात घ्यायला हवी. कारण स्तंभी ग्रहामुळे त्या ग्रहाचे त्याच्या एखाद्या कारकत्वाच्या बाबतीत अत्यंत विशिष्ट, नमुनेदार फळ संभवते. 

म्हणजेच वरील आठ ग्रहांना प्रत्येक संभाव्य स्थानावर (विकलास्तरावरच्या बिंदूवर)  मार्गी, वक्री आणि पूर्णस्तंभी अशा तीन अवस्था संभवतात. 


----

**** म्हणजेच थोडा खोल विचार केल्यास सहज लक्षात येईल की वरती जे दहा चलबिंदू घेतले त्या ऐवजी ह्या आठ ग्रहांचे आणखी १६ चलबिंदू अधिक घ्यावे लागतील.  ****

मात्र बुध व शुक्र ह्यांच्याबाबत आपण वेगळा विचार करत आहोत त्यामुळे, त्यांना वगळल्यावर  १६ चलबिंदू अधिक न घेता १२ घ्यावे लागतील. 


थोडक्यात मंगळ, गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्यांच्या साठी आपण ६ चलबिंदू (मार्गी) घेतले होते, त्याऐवजी त्यांच्यासाठी १८ (मार्गी, स्तंभी, वक्री) चलबिंदू घ्यावे लागतील. 

म्हणजेच घेतले त्याऐवजी मूळात धरलेल्या १० चलबिंदूत आणखी १२ चलबिंदू (बुध-शुक्राव्यतिरिक्त स्तंभी आणि वक्री ग्रह) जोडावे लागतील. 


म्हणजेच पायरी (B) मध्ये १२,९६,००० चा दहावा घात धरून सुरुवात करण्याऐवजी १२,९६,००० चा बावीसावा घात धरून सुरुवात करावी लागेल. 


१२,९६,०००^२२  

=  ३,०,०,१,३,०,४,३,२,२८,७७,७४,१८१,०,६,३,८,६,६,४,९,१७,७४,९७,६३५,६,९,०,९,०,०,०,४,३६,९०,५८,५८३,१,३,४,०,६ ९,८,२,७२,११,१०,०१६  x  (१०^६६)


म्हणजेच ३,०,०,१,३,०,४,३,२,२८,७७,७४,१८१,०,६,३,८,६,६,४,९,१७,७४,९७,६३५,६,९,०,९,०,०,०,४,३६,९०,५८,५८३ परार्ध, १ जलधि, ३ अंत्य, ४ मध्य, ० शंकू, ६ महापद्म, ९ निखर्व, ८ खर्व, २ अब्ज, ७२ कोटी, ११ लक्ष, १० सहस्र आणि सोळा  x १० चा सहासष्टावा घात. 


तसेच रविसापेक्ष स्थिती लक्षात घेऊन अनुक्रमे बुध व शुक्राच्या संभाव्य २,०१,६०० व ३,४५,६०० स्थानांच्या (केवळ मार्गी) जागी ते गुणक अनुक्रमे तिप्पट घ्यावे लागतील. 


म्हणजेच बुध व शुक्रासाठी ते गुणक अनुक्रमे ६,०४,८०० व  १०,३५,८०० असतील.


अर्थात बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो  ह्या ग्रहांच्या मार्गी, वक्री व स्तंभी ह्या तीनही गती लक्षात घेतल्यास 

३,०,०,१,३,०,४,३,२,२८,७७,७४,१८१,०,६,३,८,६,६,४,९,१७,७४,९७,६३५,६,९,०,९,०,०,०,४,३६,९०,५८,५८३,१,३,४,०,६ ९,८,२,७२,११,१०,०१६  x  (१०^६६)  

x

६,०४,८००

x

१०,३५,८००


=


१८,८०,१७,२६१,५,४,६,६,७,१,५,४,५२,३१,९५,२३२,१,२,८,६,७,७,८,८,०४,७४,२१,४००,३,६,२,६,०,४,७,८,८४,७२,१३,१००,९,९,४,४,८,७,५,७,६३,६५,६२,९४४ x (१० ^ ७०) 


म्हणजेच १८,८०,१७,२६१,५,४,६,६,७,१,५,४,५२,३१,९५,२३२,१,२,८,६,७,७,८,८,०४,७४,२१,४००,३,६,२,६,०,४,७,८,८४,७२,१३,१०० परार्ध, ९ जलधि, ९ अंत्य, ४ मध्य, ४ शंकू, ८ महापद्म, ७ निखर्व, ५ खर्व, ७ अब्ज, ६३ कोटी, ६५ लक्ष, ६२ सहस्र आणि नवशे चव्वेचाळीस  x १० चा सत्तरावा घात. 


अर्थात विकलास्तरावर (केतू वगळता) अकरा ग्रह व लग्न हे चलबिंदू तसेच त्यातील आठ ग्रहांच्या मार्गी, वक्री, स्तंभी ह्या तीनही गती लक्षात घेतल्यास संभाव्य असलेल्या पत्रिकांची एकूण संख्या ही तब्बल १४७ आकडी संख्या आहे   !!!!


----


========


(D) 


कृष्णमूर्ती पद्धतीने विचार करायचा झाल्यास आणि (केतूव्यतिरिक्त) सर्व ग्रह व लग्न ह्यांच्या संभाव्य स्थानांसाठी  उपनक्षत्रस्वामीचे क्षेत्र ही मर्यादा धरल्यास पायरी (B)  आणि पायरी (C) इथे दोन्ही ठिकाणी १२,९६,००० च्या जागी २४९ स्थाने घेऊन सुरुवात करावी लागेल. 

मात्र इथे बुध व शुक्रासाठी कोणते गुणक वापरायचे हे ठरविणे अवघड आहे.  कारण त्या सूर्यसापेक्ष (बुधाचे) २८ व (शुक्राचे) ४८ अंशात किती उपनक्षत्रस्वामींची क्षेत्रे असतील ह्याचे उत्तर प्रत्येक वेळी वेगवेगळे असेल. 


तरीही सोयीसाठी सूर्य मेष ०॰ ०' ०" धरून गणित केल्यास बुधासाठी पुढे २० व मागे १९ अशी उपनक्षत्र स्वामीची ३९ क्षेत्रे येतात. 

तसेच शुक्रासाठी पुढे ३० व मागे ३५ अशी उपनक्षत्र स्वामीची ६५ क्षेत्रे येतात. 


म्हणजेच पायरी (B) मध्ये

एकूण संभाव्य पत्रिका  

(२४९ ^ १०) x ३९ x ६५   


= ९१,६२,०६७,१,६,०,६,३,३,१,८,४४,०३,१०,००१  x ३९ x ६५   


= २३,२२,५८,४०,२५२,२,०,५,१,२,२,४,६,१८,५८,५२,५३५ 


अर्थात २३,२२,५८,४०,२५२ परार्ध, २ जलधि, ० अंत्य, ५ मध्य, १ शंकू, २ महापद्म, २ निखर्व, ४ खर्व, ६ अब्ज, १८ कोटी, ५८ लक्ष, ५२ सहस्र आणि पाचशे पस्तीस.


----


तसेच  पायरी (C) मध्ये

एकूण संभाव्य पत्रिका 

(२४९ ^ २२) x (३९ x ३) x (६५  x ३) 


= ५२,०,४,५,७,९,३,७,२,१४,३७,४३,२९५,४,५,३,९,९,३,०,०,२०,७३,८०,५२६,१,४,२,०,४,३,३,१,४२,०६,८२,००१   x  ११७  x  १९५


= १,१,८,७,४,२,४७,८३,७५,४५९,५०,३२,८५,७८२,८,५,०,३,४,२,३,१,३८,६७,०३,९३०,७,१,८,२,१,३,६,२,८५,९८,५२,८१५ 


अर्थात १,१,८,७,४,२,४७,८३,७५,४५९,५०,३२,८५,७८२,८,५,०,३,४,२,३,१,३८,६७,०३,९३० परार्ध, ७ जलधि, १ अंत्य, ८ मध्य, २ शंकू, १ महापद्म, ३ निखर्व, ६ खर्व, २ अब्ज, ८५ कोटी, ९८ लक्ष, ५२ सहस्र आणि आठशे पंधरा.  


थोडक्यात कृष्णमूर्ती पद्धतीतील उपनक्षत्रस्वामीची क्षेत्रे ही मर्यादा धरूनही संभाव्य पत्रिकांची संख्या आहे वर असलेले ५८ आकडी उत्तर !!


----


=============


(E)


(२) पत्रिकेचे स्थान व त्यामुळे भावबिंदूच्या आरंभ स्थानात व भावाच्या विस्तारात पडणारे अंतर व त्यामुळे भावेश व इतर बाबींमध्ये पडणारा फरक


ह्याचे गणित जवळजवळ अशक्य आहे. 


कारण ज्याप्रमाणे आपण लग्नबिंदूचा समावेश केला त्याच धर्तीवर इथे आणखी ५ भावबिंदूंचा समावेश करावा लागेल. 

मात्र ह्यातील प्रत्येक भावबिंदूला अक्षांश-रेखांशा नुसार, जन्मस्थानाशी निगडीत असलेल्या प्रमाणवेळेनुसार, ठराविक अंशांमधीलच विकलास्तरावरचे बिंदू घ्यावे लागतील. 


थोडक्यात जन्मस्थानानुसार वेगवेगळे असणारे, असे अतिशय काळजीपूर्वक करावे लागणारे, जटिल आणि तरीही अवाढव्य स्तरावर जाणारे हे गणित असेल. 


त्यामुळे वरील आकडा प्रत्यक्षात किती वाढेल हे सांगता येणार नाही. 


==============


(F) 


३) ग्रहांचा शर व त्यामुळे पडणारा फरक.  


काही ज्योतिषी फळ वर्तविताना ग्रहाची क्रांती देखील विचारात घेतात. (समक्रांती योग हा त्याचाच परिपाक आहे) त्या नुसार विचार केल्यास,

संभाव्य पत्रिकांच्या गणितदृष्ट्या काढलेल्या संख्येत फरक पडणार नाही. पण फलितदृष्ट्या फरक पडत असल्यास हा घटक महत्त्वाचा ठरतो. 


ह्याचे गणित काही प्रमाणात शक्य आहे. पण ते देखील अत्यंत जटिल आहे. कारण शर बदलेल तसा (किमान कला स्तरावर शराचा विचार)  किमान चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु व शनि ह्या सहा ग्रहांचा, स्वत:चा असा आणखी एक दोन किंवा तीन आकडी गुणक येईल. 

(इथे हर्षल, नेपच्यून आणि  प्लूटो देखील विचारात घ्यायला हवे का ?) 


तसेच कोणत्या परिस्थितीत किती अंश क्रांती गाठली जाऊ शकते, ह्या बाबतचे गणित पुरेसे स्पष्ट नाही. 


==============


(G) 


४) ग्रहांची गती


ग्रहांच्या गतीसंबंधाने मार्गी, वक्री, स्तंभी असा स्थूल विचार आपण केलाच आहे. पण इथेही केवळ ह्या तीन स्थिती विचारात गतीच्या विविध टप्प्यांचा विचार करता येईल. 

आणि हे टप्पे मंदगती ग्रहांसाठी (गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लूटो), मध्यमगती ग्रहांसाठी (मंगळ, रवि आणि शुक्र) आणि तीव्रगती ग्रहांसाठी (बुध, चंद्र) वेगवेगळे येतील. 


ह्यामुळे देखील संभाव्य पत्रिकांच्या गणितदृष्ट्या होणार्‍या संख्येत फरक पडणार नाही. पण फलितदृष्ट्या विचार करायचा झाल्यास संभाव्य पत्रिकांची संख्या महाप्रचंड असेल. 


आणि ह्याचे गणित अशक्य कोटीतलेच आहे. कारण सर्व ग्रहांना आणखी एक, एक वा दोन आकडी गुणक वाढतो. 


==============


(H)


५) ह्या व्यतिरिक्त देखील फलितदृष्ट्या काही घटक आहेत, जे पत्रिकेचा दर्जा ठरवितात.  ते विचारात घेतल्यास ही आकड्यांची गुंतागुंत प्रचंड प्रमाणात वाढेल. 


त्यात माता-पिता, जन्मस्थान (कारण देशाची, राज्याची, शहराची पार्श्वभूमी देखील बरेच काही ठरविते) आदि घटक प्रमुख आहेत. 


====


फलज्योतिषाच्या जटिलतेचा अंदाज येण्यासाठी वरील गणित व त्यातून उपजणारे आकडे उपयुक्त आहेतच, 

पण त्याचसोबत दोन व्यक्तींचे आयुष्य आणि भविष्य सारखे का नसते ह्याचा एक ढोबळ अंदाज देण्यासाठी देखील ते उपयुक्त ठरू शकतील.


====


====







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा